नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – १४ फेब्रुवारी रोजी झालेला पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा भाजपाचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे वाघेला यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत . या हल्ल्याची तुलना त्यांनी गोध्रा हत्याकांडाबरोबर केली आहे. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरातची होती. कारच्या नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असे लिहिले होते, असे ते म्हणाले .
वाघेला यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप करत पुलवामावर भाष्य केले ते म्हणाले कि पुलवामा येथील हल्ला हा भाजपाचा कट होता. गोध्रा येथील हत्याकांडही भाजपाचे षडयंत्र होते, असेही त्यांनी नमूद केले. शंकरसिंह वाघेला पुढे म्हणाले, बालाकोट येथील एअर स्ट्राइक हे षडयंत्रातील एक भाग होता. बालाकोट येथे एकही दहशतवादी मारला गेला नाही. कारण एकाही आंतरराष्ट्रीय संस्थेला एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याचे सिद्ध करता आले नाही.काही दिवसापूर्वी पुलवामाबाबत येथे गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले भाजपाकडे जर बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांविषयी माहिती होती तर त्यांनी आधीच का कारवाई केली नाही, ते काय भारतावर हल्ला होण्याची वाट बघत होते का असा सवाल त्यांनी विचारला आहे.भाजपाचे विकासाचे गुजरात मॉडल हे फसवे मॉडेल आहे. गुजरातची अवस्था बिकट असून गुजरातमधील भाजपा नेतेच पक्षनेतृत्वावर नाराज आहे असल्याचेही ते बोलले