नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात दहशत पसरली असून या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे तर लाखो लोकं संक्रमित आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कर्मचारी राज्य विमा निगमशी जोडलेल्या कर्मचारी आणि कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता सरकारने कर्मचारी राज्य विमा कायद्यातील तरतुदी तात्पुरत्या बदलल्या आहेत. याने ईएसआयसी कर्मचारी आणि कंपन्यांना आपले ‘मासिक विमा काँट्रीब्युशन’ला जमा करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. ईएसआयसीकडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फेब्रुवारी आणि मार्चसाठी ‘विमा काँट्रीब्युशन’ जमा करण्यासाठी अतिरिक्त ३० दिवसांचा वेळ दिला गेला आहे. आतापर्यंत कायद्यानुसार केवळ १५ दिवसांचा वेळ दिला जात आहे.
उदाहरणार्थ फेब्रुवारी आणि मार्च २०२० साठी ‘विमा काँट्रीब्युशन’ जमा करण्याची डेडलाइन क्रमशः १५ मार्च आणि १५ एप्रिल आहे. पण अधिसूचनेनुसार या दोन महिन्याचे काँट्रीब्युशन १५ एप्रिल २०२० पर्यंतचा वेळ दिला जाऊ शकतो.
मागच्या वर्षी केंद्र सरकारने कर्मचारी राज्य विमा निगमच्या आरोग्य विमा कार्यक्रमात नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांचे एकूण योगदान ६.५ टक्क्यावरून ४ टक्के केले होते. सरकारने या नवीन घोषणेनंतर नियोक्ता म्हणजे कंपनीचे योगदान ३.२५ टक्के झाले होते, याअगोदर नियोक्ताला ४.७५ टक्के योगदान द्यावे लागत होते. याप्रकारे कर्मचाऱ्याचे योगदान १.७५ टक्के करण्याचा निर्णय केला गेला. सरकारने या निर्णयाचा फायदा ३ कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळत असून या सगळ्या लोकांना नवीन बदलाचा फायदा मिळणार आहे.