नवी दिल्ली बहुजननामा ऑनलाईन – देशातील वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड आणि साहित्य जगतातील ४९ बुद्धीजीवी कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहीले आहे. या पत्रात देशात घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी असहमती देशाला बळ देते. परंतु देशात ही असहमती तुडवली जाऊ नये असे वातावरण तयार करावे अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा, दिग्दर्शक अनुराग कश्यप, मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन आदीती बासू यांच्यासह ४९ दिग्गजांनी मोदींना पत्र लिहिले आहे.भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. येथे प्रत्येक धर्म, समूह, लिंग, जातीच्या लोकांना समान अधिकार आहेत. मुस्लीम, दलित आणि इतर अल्पसंख्यांकावर होणारे जमावांचे हल्ले थांबले पाहिजे. असं या पत्रात म्हटलं आहे. तर नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या च्या १ जानेवारी २००९ पासून २९ ऑक्टोबर २०१८ पर्यंतची धर्मावर आधारित आकडेवारीदिली आहे. त्यात धार्मिक आधारावर झालेल्या अत्याचाराचे २५४ गुन्हे दाखल आहेत. यात ९१ लोकांची हत्या झाली आहे.असा उल्लेख आहे.
तर देशात १४ टक्के मुस्लीम आहेत. त्यात ते ६२ टक्के गुन्ह्यांचे शिकार बनले आहेत. असे ९० टक्के गुन्हे मे २०१४ नंतर मोदी सत्तेत आल्यानंतर घडल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी या घटनांची निंदा केली असली तरी ती पुरेशी नाही.असे गुन्हे करणाऱ्यांविरोधात काय कारवाई करण्यात आली हे ठाऊक नाही. परंतु असे गुन्हे अजामीनपात्र करावेत. दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. जेव्हा खुनातील आऱोपीला विना पॅरोल जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते तर मग मॉब लिंचिंगच्या आरोपीला का नाही. अशा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देशात कोणालाही भितीखाली वावरण्याची गरज पडणार नाही. असं या पत्रात म्हटले आहे.
तर लोकशाहीमध्ये असहमतीची जोरदार शिफारस करण्यात आली आहे. लोकशाही असहमतीशिवाय वाढू शकत नाही. जर कोणी विरोधात मत व्यक्त करत असेल तर त्याला देशविरोधी किंवा अर्बन नक्षल ठरविणे चुकीचे आहे. देशात सत्ताधारी पक्षावर टीका करणे म्हणजे देशावर टीका करणे नाही.कोणताही पक्ष सत्तेत येतो तेव्हा देशाचं प्रतिक बनत नाही. त्यामुळे या देशात सरकारविरोधात बोलणे म्हणजे देशविरोधी बोलणे आहे. असं नाही. असंही त्या पत्रात म्हटले आहे.