बहुजननामा ऑनलाईन : शहरातील गारठा वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा(Mercury) सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदवले. पुण्यात किमान तापमान 15.01 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून पुढील दोन दिवसात 15 ते 16 अंश सेल्सिअस राहिल, असा अंदाज वर्तवला आहे.
पुण्यात 31 ऑक्टोंबरला 15.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा 18.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत 2 अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊन, ते बुधवारी(Mercury) सकाळी साडेआठ वाजता 15.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवसामध्ये आकाश निरभ्र राहणार आहे. त्याचवेळी कमाल तापमान 31 आणि किमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण 93 टक्क्यांपर्यंत आहे.
राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून गारठा वाढत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यात आता थंडीसाठी अनुकुल वातावरण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसात राज्यात थंडी (next-few-days-state-will-get-
राज्यातील किमान तापमान
मुंबई 25, रत्नागिरी, 22.5, डहाणू 23.5, पुणे 15.1, जळगाव 15.2, कोल्हापूर 19.4, मालेगाव 17.4, नाशिक 15.4, सांगली 18.3, सातारा 16.5, सोलापूर 16.4, औरंगाबाद16.3, बीड, 16.19, परभणी 14, अकोला 15.6, अमरावती 13, बुलढाणा 16.6, चंद्रपूर 12.2, गोंदिया 13.6, नागपूर 12.8, वर्धा 14.4
राज्यातील हवामानाचा अंदाज
हवामान खात्याच्या मराठवाडा उपविभागातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे आणखी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम आदी भागात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे या भागात अजून थंडी वाढण्याची शक्यत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे किमान तापमानात कमालीची घट होईल. कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई शहर, ठाणे येथे थोड्याप्रमाणात थंडी वाढेल. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगर या भागात थंडीची तीव्रता वाढेल.