बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Goswami ) यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना विरुध्द भाजप अशी शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. अर्णब (Goswami )यांची अटक म्हणजे राज्यातील अघोषित आणीबीणी असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit-shah) यांनीही अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला होता. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
गोस्वामी यांच्या अटकेनंतर शहा यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला होता. तसेच, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीची लाज काढली. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते, अशी टीका सत्ताधारी महाविकास आघाडीवर केली होती. शहा यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना गोस्वामी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते पक्षाची बाजू मांडत आहेत, असा टोला लगावला आहे.सामना जसे शिवसेनेचे मुखपत्र आहे तसे ते त्यांचे चॅनेल. तो कदाचित भाजपचा लाऊडस्पीकर असेल. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे हे समजून घेणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकार म्हणून त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांनी कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्यातून अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. आत्महत्या कोणामुळे केली हे लिहून ठेवले आहे. सुशांतसिंह प्रकरणात नव्हते. पण त्या प्रकरणात वेगळी भूमिका घेण्यात आली आणि या प्रकरणी राज्य आणि केंद्रातील भाजपची भूमिका वेगळी आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.