सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाज अनेक वर्षापासून मागासलेले जीवन जगत आहे. आता बदलत्या काळानुसार समाजाने बदल स्वीकारला पाहिजे. शेती या पारंपारिक जोखडातून बाहेर पडून शिक्षण आणि उद्योग क्षेत्र देखील काबीज केली पाहिजेत, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके यांनी केले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव व शिव जन्मोत्सव दिनानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी शेळके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, सामाजिक वनीकरण अधिकारी सुवर्णा माने, प्रधानमंत्री आवास योजनेचे उप अभियंता शिवराम केत, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे संतोष पवार, सकल मराठा समाजाचे माऊली पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पवार, दत्ता मुळे, अभिंजली जाधव, सोमनाथ राऊत, भाऊसाहेब रोडगे, प्रकाश नणवरे, डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, डॉ.जी.के. देशमुख, दिनकर देशमुख, इम्तियाज पीरजादे, अविनाश गोडसे उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रात प्रबोधनाचे काम करणारे ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, पत्रकार शेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पांडुरंग सुरवसे, हरिभाऊ कदम, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणारे राजेंद्र भोसले, उद्योजक आणि समाजसेवेच्या माध्यमातून काम करणारे देविदास चेळेकर, फारुक शेख, सुनीता पाटील, गणेश निळ, क्रिडा क्षेत्रांमध्ये शिवतेज सिंह कांचन आणि कला क्षेत्रामध्ये विनायक शिंदे आणि सुदर्शन माने यांचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वर्षा मुसळे आणि नीलम खटके यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला.
यावेळी संजय जाधव, जीवन यादव, आर.पी. पाटील, परशुराम पवार, ॲड. दिपा भोसले, प्रतिज्ञा भोसले, नलिनी जगताप, प्राजक्ता बागल, लता ढेरे, दीपा, संजीवनी मुळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधूरा मुसळे आणि मनाली जाधव, सानिका पवार यांनी केले तर आभार संजीवनी मुळे यांनी मानले.