औरंगाबाद न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेला टाळे लागले. तेव्हापासून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन(online)च्या माध्यमातून शिकवले जात आहे. मागील वर्षांपासून वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे शाळेची दारे खुलीच झाली नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत आहे. यावरून राज्य सरकार(state government)च्या शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) कोरोनामुक्त असलेल्या गावात शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचे आदेश दिलेत. यावरून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यातील लोहगाव येथील केंद्रातील 8 पैकी 4 माध्यमिक शाळांची गुरूवारी (15 जूलै) रोजी घंटा वाजली (Maharashtra School Reopen). दीड वर्षानंतर कोरोनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी वर्गात ऑनलाईनऐवजी ऑफलाईन(offline)द्वारे अभ्यासक्रमाला सुरवात केली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी
लोहगाव (Lohgaon) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्राअंतर्गत येणाऱ्या 8 माध्यमिक
शाळांपैकी जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळा तोडोंळी आठव्या वर्गातील (11 पैकी 7),
जिल्हा परिषद शाळा शेवता (25 पैकी 10), दिन्नापूर जिल्हा परिषद शाळा (20 पैकी 4),
तर खासगी अनुदानित मारोतराव पाटील विद्यालयात 8 वीत (45 पैकी 13), नववीत (56 पैकी 3),
दहावी वर्गातील (64 पैकी 12), अशा विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, 4 माध्यमिक शाळांमध्ये अधिक कोरोनाच्या नियमाचे पालन करणे, शिक्षकांची RTPCR टेस्ट, संसर्ग प्रादुर्भाव, विद्यार्थी आरोग्य सुविधा आदी नियमने लागू करून शाळा सुरु करण्यात आल्या माहीत. दरम्यान, सुरु झालेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख मनोज सरग (Center Head Manoj Sarag) यांनी 4 माध्यमिक शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क वापर, वर्गखोल्या सॅनिटायझ, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा आढावा घेतला आहे.
Web Title : Maharashtra School Reopen | after one and half year schools reopen in paithan of aurangabad district