मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) नागपुर येथील कार्यक्रमात समाजातील जातीभेद, वर्णभेदावरून काही वक्तव्य केली आहेत. यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या मताला सहमती दर्शवली आहे. (Maharashtra Politics)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शरद पवार म्हणाले की, मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आले. ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसते माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. (Maharashtra Politics)
काय म्हणाले मोहन भागवत…
– भेदभावाला कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी लॉक केल्या पाहिजेत. वर्ण आणि जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत.
– वर्ण आणि जातिव्यवस्थेत मुळात भेदभाव नव्हता आणि त्याचे उपयोग होते. आज जर कोणी या संस्थांबद्दल विचारले तर त्याचे उत्तर हेच असेल की, तो भूतकाळ झाला आहे, चला विसरूया.
– जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. याचा अर्थ ते सारेच कुटिल होते असे नाही. आपल्या देशातही हेच झाले. आपल्यातील दरी वाढत गेली.
– दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही.
– दरम्यान, महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचारप्रस्थापित करण्यात आला आहे.
त्यात नायक आणि खलनायकाचे विचारही तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत.
– परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबवले आणि
त्यात सारा समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Politics | ncp chief sharad pawar reaction over rss chief mohan bhagwat statement
हे देखील वाचा :
Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना