मुंबई बहुजननामा ऑनलाइन : ATM च्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. एटीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक झाल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. एटीएमद्वारे फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. एटीएमला स्कीमर बसवून किंवा मशीन फोडून ग्राहकांचे पैसे चोर चोरतात. आतापर्यंत चोरट्यांनी अनेक ग्राहकांच्या कष्टाचा पैसा चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. औरंगाबादमधून तर चक्क ATM मशीनच पळवून नेली. एटीएमद्वारे झालेल्या फसवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं उघड झाल आहे.
महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे २३३ गुन्हे दाखल झालेत. यांत ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झालीय. एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत एटीएम फसवणुकीच्या १७९ घटना समोर आल्या असून यांत २.९० कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तामिळनाडूत एटीएमद्वारे ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झालंय.
अशी ही घ्या काळजी
– सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममधून पैसे काढू नका.
– एटीएममध्ये सीसीटीव्ही आहे की नाही याची खातरजमा करून घ्या.
– तुम्ही कार्ड टाकता, त्याच्या खाली काही यंत्रणा स्कीमर लावलंय का हे तपासा.
– कार्ड टाकता त्या जागी लाइट ब्लिंक होते का हे पाहा.
– अकाऊंटमधून तुम्ही पैसे काढले नसतील आणि तरी तसा मेसेज आला असेल तर तातडीने कार्ड ब्लॉक करा.
– पोलीस आणि बँकेत तातडीने तक्रार करा.
-अशा घटनांमध्ये सामान्य लोकांचा पैसा चोरीला जातो.सामान्य लोकांना तोटा होतो.