मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील म्हणाले की, ”भाजपाने पक्ष फोडण्याचं जे काम केलं, त्या मार्गाने आम्हाला जायचं नाही. राज्य कोणत्याही परिस्थिती मिळवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न जे देवेंद्र फडणवीस सरकारने केले. त्याची महाराष्ट्राने त्यांना शिक्षा दिलेली आहे.” खातेवाटप करण्याचा सर्व अधिकार मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करत आहेत, तेच योग्यवेळी निर्णय घेतील, यात कोणतीही अडचण नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार तुम्हाला झालेला दिसेल असंही जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे.
आमच्या पक्षात जर कुणाला यायचं असेल तर रीतसर त्यांच्याबाबत चर्चा केली जाईल. सरकार वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आम्ही पक्षांतर कुठेही करू देणार नाही. पण जर स्थानिक पातळीवर कुणाला आमच्या पक्षात यायचं असेल, तर त्याचं स्वागत करताना आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेवून पावलं टाकू. जे आम्हाला सोडून गेले त्यातील अनेकजण अस्वस्थ आहेत, संपर्कात आहेत. गडबडीत कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या भाजपचे काही आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूकीत अगोदर काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणाऱ्यांची घरवापसी होणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी टीका केली की भरती जेवढी मोठी ओहटी देखील तेवढीच मोठी हा तर नैसर्गिक नियम आहे. ओहटी सुरु झाली आहे असे सूचक व्यक्तव्य त्यांनी केले. भाजपातील सक्षम नेतृत्वाला दुर्देवाने दूर लोटल्या गेले तसेच भाजपातील जुन्या मंडळींची अस्वस्थाता आम्हाला जाणवत असल्याचे देखील थोरात म्हणाले होते.
Visit : bahujannama.com