बहुजननामा ऑनलाईन टीम : लवकरच शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. आता हा सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा सगळ्यांना आहे. नुकतेच काल कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबतच्या सरकार स्थापनेची माहिती दिली आहे.
यामध्ये शिवसेनेसोबतच्या संभाव्य सरकार स्थापनेवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘जर आम्हाला ५ वर्ष एकत्र राहून स्थिर सरकार द्यायचे आहे तर काही मुद्द्यावर स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यावर आमची चर्चा सुरु आहे. आज आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत. आपण सर्वजण राज्य घटनेला मानतो. राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला मानतो त्यामध्ये वेगळा आग्रह असण्याचे कारणच नाही.’
Maharashtra Congress chief Balasaheb Thorat on Maharashtra govt formation: There are many points on which we need clarification if we have to run a government together for 5 years. Discussions are progressing. We will go to Mumbai today. pic.twitter.com/cJKuYQbmNJ
— ANI (@ANI) November 21, 2019
गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा मोठा प्रश्न लवकरच सुटण्याचे चिन्ह दिसत आहे. सरकार स्थापनेसाठी सुरु असलेली शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडे साडेतीन तासाच्या चर्चेत सत्ता वाटपाची चर्चा पहिली झाली. त्यानंतर दोन्ही पक्षात किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्विकारण्यावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. अद्यापही मंत्रिपदाच्या वाटपावर स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेला पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळण्याचा अंदाज लावला जात आहे. पण राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांशी चर्चा करुन याचा निर्णय घेण्यात येईल.
Visit : bahujannama.com