मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकरानं त्यांची ही अवस्था करून ठेवलीय, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. या प्रचार सभेत फडणवीस यांनी भाजप सरकारने केलेल्या कामांची चर्चा केली.
त्यांनी विरोधी पक्षांवर अनेक टीका केल्या. तसेच कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांना निवडून द्या, असे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले. त्यांनी या प्रचारसभेत कलम ३७० आणि पाकिस्तानचा मुद्यावर बोलणं टाळलं आणि पाच वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामांचे मुद्दे मांडले.
Visit : bahujannama.com