बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे पक्ष आणि प्रचार यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. विरुद्ध उमेदवारावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अश्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला आहे. ‘आम्ही बंद खोलीतील माणसं नसून उघड्या मैदानात लढणारी माणसं आहोत. शिवसेना ही बोलतो, पाहतो, करतो यांच्यातील नाही, तर उद्धव आणि आदित्यची शिवसेना जे बोलते ते करते अशी आहे,’ असं सांगून उद्धव पुढे म्हणाले कि, ‘मी मॅच जिंकलेली असून माझी धावसंख्याही ठरलेली आहे,’ असा दावाही उद्धव यांनी यावेळी केला.
दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले कि, ‘ही निवडणूक म्हणजे अन्यायाविरुद्धचे बंड आहे. बंड असणे गरजेचे आहे. अमरावती स्वाभिमानी असल्याने इथं पैसा चालणार नाही. त्यामुळे पैशांच्या विरोधात, दलालीच्या विरोधात आपल्या सर्वांना बंड करायचे आहे. मागील निवडणुकित जरा गोंधळ उडाला, एकीकडे संपूर्ण देशामध्ये भगवा असताना अमरावतीमध्ये भगवा नाही, याची मला खंत आहे. परंतु आता हे होणार नाही. आता अमरावतीमध्ये युतीचे आठही आमदार निवडून आले पाहिजेत. भगव्याचे मावळे विकले जात नाहीत, हे दाखवून द्या.’ असा इशारा उद्धव यांनी केला.
उद्धव यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले कि, जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात. पैशांच्या विरोधात, दलाली विरोधात बंड करायचे आहे. त्याचप्रमाणे १० रुपयाचे शिवभोजन देणार आहे. रुपयांमध्ये गरीबांना प्राथमिक आरोग्य चाचण्या करून देणार आहेत. महत्वाचे बाब म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणार. ‘कर्जमाफी’ हा शब्द मला पटत नाह, तसेच उद्धव ठाकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची बाजू मांडत, राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षातून युतीमध्ये आले कारण ते काम करण्यासाठी राजकारणात आले आहेत. तसेच जी वचने तुम्हाला दिलेली आहेत, ती पूर्ण करण्यास मी बांधिल आहे, निवडणुकीनंतर मी पुन्हा अमरावतीमध्ये येणार आणि ही वचने पूर्ण करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Visit : bahujannama.com