वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवार यांनी कुटुंबाच्या पलीकडे कधी काम केलं नाही. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करत आहोत. छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल तर ते नाव आहे नरेंद्र मोदी असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केलं आहे. शरद पवार हे अनेक वर्षे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून गाजले. त्यांनी काय केलं हे जनतेला कळू लागलं आहे असंही अहिर म्हणाले. वर्ध्यात बॅचलर रोडवर स्थापित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
हंसराज अहिर म्हणाले की, “जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही. खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची गरज ओळखून विकासाची कामे हाती घेतली. कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहूज जी कामे होती घेतली ती पाहून देशाचा जाणता राजा कोणी असेल तर छत्रपती शिवरायांनंतर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. काँग्रेस सराष्ट्रवादीतील मंडळी मोदी आणि फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहेत.
‘देशातील सरकार सावरकर भक्तांचं’
अहिर पुढे म्हणाले, “देशातील सरकार हे सावरकर भक्तांचं सरकार आहे. त्यात नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी या सगळ्यांना मी निस्सीम भक्त म्हणून ओळखतो. अखंड भारताचं स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेत आहे. देश आता सुरक्षित, संपन्न आणि सामर्थ्यवान बनत आहे. त्यांच्यामध्ये प्रेरणा सावरकरांचीच आहे.”
- काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
- अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा
- ‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या
- कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर
- कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या
- ‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय
- तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या