बहुजननामा ऑनलाईन टीम : अवघ्या काही दिवसांत विधानसभेची निवडणूक होणार आहे, सर्व पक्ष त्यासाठी तयारी करत आहे. मात्र दुसरीकडे अश्या वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेरून आता राष्ट्रवादीतील नेत्यांचे आपापल्यातच खटकल्याचं दिसून येत आहे. बाळासाहेबांच्या अटकेच खापर छगन भुजबळ यांच्यावर फुटल्याने त्यांनीदेखील आता याला चोख प्रतिउत्तर दिलेलं आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या अटकेला विरोध होता पण विभागप्रमुखांच्या हट्टीपणामुळे कारवाई झाली, असा थेट आरोप छगन भुजबळ यांच्यावर झाला होता.
याचाच पलटवार करत भुजबळ यांनी ‘ ज्या दिवशी शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला’,अशा शब्दांत अजित पवारांवर टीका केली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. भुजबळांची हे विधान करत पवारांच्या याच जखमेवरील खपली काढली आहे .
भुजबळ म्हणाले कि, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या दिवशी ईडी कार्यालयात बोलावले होते. त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. पवारांवर बँकेचं सदस्य आणि संचालक नसतानादेखील गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण पेटलं . पण काही वेळानं वातावरण बदललं आणि फोकसही बदलला. अजित पवार भावनाप्रधान आहेत हे मान्य पण दोन दिवस भावना आवरल्या असतं तर बरं झालं असतं’, अश्या खोचक शब्दात त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. तसेच बाळासाहेब यांच्या अटकेसंदर्भात भुजबळ म्हणले कि. ‘बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. मी त्यांना जेलमध्ये न पाठवता मातोश्रीवरच ठेवणार होतो. पण त्यांना त्रास द्यायचा नव्हता.’
Visit : bahujannama.com