पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शेतकरी ,बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाचे काय झाले ते अजून मार्गी का लागले नाहीत तसेच पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा भाजपाला विसर पडला आहे. मोदी सरकारने राफेलच विमान जास्त किमतीला का विकत घेतलं ते त्यांनी सांगावं ,भाजप सरकार फक्त निवडणुकीच्या मागे लागली आहे रोजगाराच काय याबद्दल ते बोलत नाही अशी टीका अजित पवार यांनी मोदीसरकार वर केली ते पुणे येथील प्रचार सभेत बोलत होते .
मोदींनी वर्धा येथील प्रचार सभेत पवार घराण्यावर वैयक्तिक टीका केली होती त्यावर पवार यांनी टीकेला उत्तर देत पवार कुटूंबियांचे आह्मी बघून घेऊ तुह्माला काळजी करायची गरज नाही काळजी करायचीच असेल तर देशातील शेतकरी ,बेरोजगार लोकांची करा असा सवालही त्यांनी केला सव्वाशे कोटी जनतेचे नेते अशा पध्दतिची भाषा वापरतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे .
मोदी सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास झाला असून जनता जिएसटी आणि नोटबंदीला कंटाळली आहे ,आघाडी सरकारच्या काळात जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले होते असे ते बोलले . मोदी विष्णुचा अवतार आहे असे भाजपवाले सांगतात ,तर हनुमानाची जात काढतात जनता त्यांना नक्की धडा शिकवेल माझ्याकडून भूतकाळात काही चुका झाल्या पण भूतकाळातील चुकांमधून शिकलो ,राहुल गांधींच्या जाहीरनाम्यातील अनेक योजनांचा उल्लेखही पवार यांनी केला.