बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात येत असून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये आणि फलाटांवर होणारी गर्दी लक्षात घेता, भारतील रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
देशातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरानासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान रेल्वेमध्ये आणि फलाटांवर होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अद्याप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करायची की नाही याबाबत निर्णय झाला नसला तरी रेल्वेकडून तिकिटदरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ही शक्कल लढवण्यात आली आहे. हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई, पुणे भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून वाढवून 50 रुपये करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पश्चिम रेल्वेच्या विविध ठिकाणांवर विविध प्लॅटफॉर्म तिकीट दर निश्चीत करण्यात आले आहेत.