बहुजननामा ऑनलाईन टीम : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा म्हणाले की, मला मुख्यमंत्री करण्यासाठी 17 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्याग आणि पंचमसाली मठाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आहे. ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला सूचना देऊ शकता की 3 वर्षापर्यंत सरकार कसे चालवावे, परंतु जर तुम्ही माझे म्हणणे मानत नसाल तर मी सीएमची खुर्ची सोडून घरी बसायला तयार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 15 जानेवारीनंतर लगेचच येडीयुरप्पा आपल्या सरकारचा विस्तार करू शकतात.
मंत्रिमंडळ विस्तारात एक डझनपेक्षा जास्त नवे मंत्री घेतले जाऊ शकतात. यामध्ये ते सर्वात जास्त बंडखोरांना समावून घेऊ शकतात आणि सोबतच लिंगायत-गैर लिंगायत फरकही भरून काढू शकतात. याशिवाय बेळगावी भागाचे प्रतिनिधीत्व वाढविण्याची चर्चा सुद्धा आहे. परंतु सध्यातरी येडीयुरप्पा यांनी याचे खंडन करताना म्हटले की, पंचमसाली लिंगायत समाजातून कोणाला मंत्री बनवावे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही अडचणींमुळे रोखला आहे. येडीयुरप्पा हे कुठलेही काम ज्योतिषाला विचारल्याशिवाय करत नाहीत. कर्नाटकात मागील महिन्यात पोटनिवडणुका झाल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या सरकारला समर्थन देणारे काँग्रेस आणि जेडीएस चे जवळपास सर्व बंडखोर पुन्हा आमदार म्हणून निवडुन आले आहेत आणि मंत्री होण्यासाठी दबाव आणत आहेत.
Visit : bahujannama.com