बहुजननामा ऑनलाईन टीम : कर्नाटकातील निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यकत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्रा यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे. दरम्यान, अंतिम निकाल हाती येण्याआधीच कॉंग्रेसने पराभव मान्य केला आहे. कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी सांगितले की, मतदारांनी दिलेला कौल मान्य करावा लागेल. लोकांनी पक्ष बदलणाऱ्यांनाच निवडून दिले आहे. आम्ही पराभव स्वीकारतो पण आम्हाला नाही वाटत की त्यामुळे आम्ही निरोश झालो पाहीजे.
Bengaluru: Karnataka Chief Minister BS Yediyurappa celebrates with his son BY Vijayendra as BJP leads on 12 out of 15 seats in #KarnatakaAssemblyBypolls. pic.twitter.com/0uualeU8Yg
— ANI (@ANI) December 9, 2019
कर्नाटकमध्ये असलेले मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या भाजप सरकारचे भवितव्य आज ठरणार आहे. विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता जवळपास चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने १५ पैकी १२ जागेवर आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेसने २ आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपला किमान ७ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते.
5 डिसेंबरला या 15 जागांवर मतदान झाले होते. 67.91 मतदानाची टक्केवारी होती. सकाळी 8 वाजता मजमोजणीला सुरुवात झाली असून काही तासांमध्येच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हायकोर्टात सुनावणी असल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणुक झाली नव्हती. येडुरप्पा सरकारने २९ जुलैला विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. अनेक दिवस रंगलेल्या नाट्यांनंतर कर्नाटकातले कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते आणि त्यानंतर येडुरप्पा यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. कॉंग्रस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत सरकारचा पाठींबा काढून घेतला.
या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्यामुळे रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली. सोमावरी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सात जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे निकालाकडे येडियुरप्पा सरकारचं लक्ष लागलं आहे. आधिच भाजपच्या हातून मोठी आणि महत्त्वाची राज्य गेल्यामुळे आता कर्नाटकात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण जागा 225 आहेत. मात्र, त्यातला 17 सदस्यांना अपात्र ठरविल्यामुळे संख्या 208 वर आली होती. कर्नाटक विधानसभेत भाजपाला 105, जेडिएसला 34 तर कॉंग्रेसला 66 जागा आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बहुमत स्थिर सरकार चालविण्यालाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणे महत्वाचे आहे. कारण काठावरच बहुमत असले तर कर्नाटकात कायम अस्थिरता बघायला मिळते. भाजपला बहुमतापासून काहीच जागा कमी होत्या त्यामुळे कॉंग्रेसने जेडीएसला समर्थन दिले त्यामुळे कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले मात्र, हे सरकार फार काळ टिकले नाही.
Visit : bahujannama.com