मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा दिवसांत पाच प्रकरणांमधील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आंदोलनकर्त्यांकडे मराठी आंदोलनकर्त्यांविरोधात नोंदविलेले २८८ खटले रद्द करण्याची विनंती केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ३००० आंदोलन करणार्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा ३ हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मराठा आंदोलकांवर असलेले ३५ गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. यामध्ये विरोध करताना पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेले आणि पोलिस कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मेट्रो कारशेड, नाणार प्रकल्प, कोरेगाव भीमा हिंसा, शेतकरी आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली आहे.
Visit : bahujannama.com