बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असताना सीमेरेषेजवळ पाकिस्तानकडून कुरापती केल्या जात आहे. रविवारी सकाळी भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकार्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.
Colonel Ashutosh Sharma, Commanding Officer of 21 Rashtriya Rifles unit lost his life in an encounter yesterday with terrorists in Handwara area of Jammu and Kashmir. He had been part of several successful counter-terrorist operations in the past. pic.twitter.com/0buVlo9shj
— ANI (@ANI) May 3, 2020
शहीदांमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. यापूर्वी शर्मा यांचा काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये मोठा सहभाग राहिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान सीमेरेषेजवळ सातत्याने गोळीबार करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. अनेकवेळा कश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार केला जात आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पाकिस्तांनची कुरघोडी यामुळे कश्मिरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Based on the intelligence input that terrorists were taking the civilian inmates of a house in Changimulla, Handwara of Kupwara district hostage, a joint operation was launched by Army and JK Police: Army Spokesperson on Handwara Operation in Jammu & Kashmir
— ANI (@ANI) May 3, 2020
एनपी न्यूज24 नेटवर्क