मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजप सरकारने येथील गोरगरिबांच्या जमिनी लाटल्या आता हे गावठाण्याच्या जमीनी लाठण्याकडे त्यांचे लक्ष आहे.हे बिल्डरांना पोसणार सरकार आहे. निवडणूक लढविणाऱ्या अशा बिल्डरांना त्यांची जागा दाखवा. हे चोरांच सरकार आहे. त्यांना मतदान करु नका असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. कारण मुंबईतील कोळीवाडे व गावठाणे यांच्या जमिनीवर ह्या चोरांचं लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विचारपीठावर ॲड. प्रकाश आंबेडकर. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी. आ. वारीस पठाण. आ. इम्तियाज जलिल. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर. माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील व ओबीसी संघटनांचे नेते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी ची ही सभा शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर घेण्यात आली होती. या झालेल्या विराट सभेत लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुुंकले. आंबेडकरांनी काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस सह सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचि भूमिका घ्यावी. आणि केंद्रात सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तर त्यांच्याशी युती करण्याची आमची तयारी आहे. असे ते म्हणले.
भाजप हे कडवे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आहे तर काँग्रेस सौम्य हिंदुत्वाचा. मात्र दोन्ही पक्ष मनुवादी आहेत. हा मनुवाद पुन्हा आला तर मुस्लिम आणि दलित समाजाला लक्ष्य केले जाईल. त्यामुळेच मुस्लिम व दलित समाजाने एकत्र लढा द्यायला हवा. असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
सभेमध्ये बोलतांना आंबेडकर म्हणले कि सर्वाना मोफत शिक्षण दिले जाईल व आम्ही शिक्षणावर १० टक्के खर्च करायाला तयार आहोत. वंचितांच्या विकासाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असे आवाहन आंबेडकरांनी केले