नवी दिल्ली वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. भारताच्या मून स्पेसक्राफ्ट चांद्रयान -२ ने अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. हे फोटो पाहिले तर तुम्ही चकित व्हाल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
ISRO (Indian Space Research Organisation): Earth as viewed by #Chandrayaan2 LI4 Camera on August 3, 2019. pic.twitter.com/QKU9iL8O8m
— ANI (@ANI) August 4, 2019
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार चांद्रयान -२ ने हे फोटो LI4 या कॅमेऱ्यामधून काढले आहे. ज्यातून पृथ्वी ही निळ्या रंगाची दिसते आहे. युनिव्हर्सल वेळेनुसार हे फोटो १७ वाजून ३२ मिनिटांनी काढले आहेत. २२ जुलै ला चांद्रयान -२ लॉन्च केल्यानंतर २ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी चांद्रयान -२ च्या कक्षेत चौथ्यांदा यशस्वीपणे बदल केला आहे.
आता ६ ऑगस्ट पर्यंत पृथ्वीच्या चारही बाजुंनी चांद्रयान -२ चे ऑर्बिट बदलले जाईल. लॉन्च झाल्यानंतर चांद्रयानचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी ४८ दिवसांचा प्रवास सुरु झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधकांनी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणनंतर त्यात बरेच बदल केले आहेत.
चांद्रयान -२ हे अंतराळ यान २२ जुलै पासून ६ ऑगस्ट पर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंना फेऱ्या मारेल. त्यानंतर १४ ऑगस्टपासून २० ऑगस्टपर्यंत चंद्रापर्यंत जाणाऱ्या मोठ्या कक्षेचा प्रवास करेल. २० ऑगस्टला हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर ३१ ऑगस्ट पर्यंत हे यान चंद्राच्या चारही बाजूंना फेऱ्या मारेल. त्यानंतर १ सप्टेंबर ला हे यान विक्रम लैंडर ऑर्बिटरपासून वेगळं होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे प्रस्थान करेल.