औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने लाखोंच्या संख्येने ऐतिहासिक मोर्चे काढून मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मोर्च काढण्यात आले होते. मराठा समजला सरकारकडून केवळ आश्वासनेच मिळाली आहेत.या आश्वासनांनी मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या नावाने बोंबाही मारल्या.
मराठा क्रांती मोर्चची सुरवात औरंगाबादेतून झाली होती. मोर्चाने मागील अडीच वर्षांत सातत्याने सरकारला धारेवर धरले असताना आरक्षणाचा तिढा अजून सुटला नाही. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांची बोळवण करीत काही जणांना हाताशी धरत सरकारने आंदोलन थांबविण्याचे प्रयत्नही केले. अडीच वर्षांत एकही मागणी पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी मराठा क्रांती मोर्चकडून केली जात आहे.
आरक्षण व इतर मागण्यासाठी आगामी भूमिका काय हे ठरविण्यासाठी लवकरच राज्यभर बैठका घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पुन्हा एकदा क्रांती मोर्चाचे वादळ सुरू होणारचं असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. याप्रसंगी समाजाच्या प्रश्नांवर सतत लढा उभा करणारे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.