नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारने दरवर्षी कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या आकड्यांमुळे केंद्रातीकेंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. मागील पाच वर्षांत जवळपास दोन कोटी पुरूष बेरोजगार झाले, असा धक्कादायक खुलासा NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस) च्या रिपोर्टमधून झाला आहे.
NSSO च्या रिपोर्टबाबत नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.२०१७-१८या वर्षात NSSO ने केलेल्या सर्व्हेमधून खुलासा झाला आहे की, पुरुष कामगारांची संख्या २८ कोटी ६० लाख एवढी घसरली आहे, जी २०११-१२ मध्ये ३०कोटी ४० लाख एवढी होती. तसेच २०११-१२पासून आतापर्यंत एकूण ४ कोटी ७०लाख रोजगार कमी झाले आहेत. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारी दर ७. १टक्के एवढा राहिला आहे तर ग्रामीण भागात हा दर ५. ८ टक्के एवढा आहे.