पंढरपूर बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मोठ्या आंदोलनांनी रान पेटविल्यानंतर मराठा समजाला आरक्षण मिळाले. मात्र आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला आहे. भाजपने धनगर समाजाल आरक्षण देण्याची घोषणा जाहिरनाम्यात केली होती. सत्तेवर येताच भाजपकडून याला बगल देण्यात आली. यामुळे धनगर समजा आक्रमक झाला असून पंढरपूरला अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि आमदार रामहरि रुपनर यांनी दिली आहे.
धनगर आरक्षणाची सुरुवात पाच वर्षांपुर्वी पंढरपुरमध्ये झाली होती. त्यानंतर बारामती येथे मोठं आंदोलन धनगर समाजाकडून करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना तेथे येऊन आश्वासन दिलं होतं. मात्र सत्ता येताच त्यांनी या प्रश्नाला बग दिली. जाहिरनाम्यातही सत्तेत आल्यावर धनगर समजालाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल असं आश्वासन भाजपकडून दिलं गेलं होतं. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक झाला असून यासाठी पंढरपुरमध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने दोन लाख धनगर समाजाच्या उपस्थितीत आरक्षण मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि आमदार रामहरी रुपवनवर यांनी दिली.
परंतु शरद पवार यांच्या उपस्थितीला कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. शरद पवार यांनीच धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला असून ते सत्तेत असताना हा प्रश्न सोडवू शकले असते. परंतु त्यांनी तो सोडवला नाही. असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना सभेत बोलू दिले जाणार नाही. असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.