नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची जाहिरातबाजी केली जाते. पंरतु पाचशे रुपये महिन्यात शेतकऱ्याचे घर चालू शकते का? शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी संपुर्ण देशात युपीएच्या काळात केल्याप्रमाणे कर्जमाफी करावी. अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केली.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलीयन डॉलरपर्यंत नेण्याची चर्चा आपण करत आहात. परंतु त्याचवेळी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. ती म्हणजे २०१५ ते २०१८ या तीन वर्षात महाराष्ट्रात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा देशाच्या अर्थ व्यवस्थेबाबत आपण सांगू तेव्हा ती मुलं म्हणतील की, ते सोडा पण आमचा बाप आम्हाल परत आणून द्या. अशी टीका अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.
२०१९-२० दिशाहीन अर्थसंकल्पात शेतीसाठी ठोस उपाययोजना करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असुन, किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दररोज १७ रुपये या प्रमाणे पैसे देणे म्हणजे क्रूरचेष्टा आणि थट्टा बळीराजाची सरकारने चालवली असुन , निवडणूकीच्या प्रचारात भाजप सरकारने शेतमालास हमीभाव देऊ. अस पोकळ अश्वासन दिले व निवडून आल्यानंतर या गोष्टींचा विसर पडला असुन ही खेदजनक बाब आहे. असंही त्यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
युपीएच्या काळातल्यासारखी कर्जमाफी द्या
शेतकरी कर्जमाफीवर केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन काहीही होणार नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा करतात. अशा दोन भूमीका भाजप घेते. हा देखील जूमलान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात २००९ साली युपीए सरकारने ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यानां कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
बैलगाडा शर्यतींना परवानगी द्या
अग्रो टुरिझमसारखी तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्याची ताकद अग्रो टुरीझममध्ये आहे. त्यापैकी असलेल्या बैलगाडा शर्यतीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करता येईल. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना परवानगी द्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.