मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग आहे. मात्र इथे धोकादायक इमारतींपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी. तसेच या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्यांनी ही मागणी केली.
डोंगरीतील केसरबाई या इमारतीच्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले. त्यात म्हाडा आणि महानगरपालिका असा वाद न करता दूर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. डोंगरी हा जुन्या मुंबईचा भाग आहे. महानगरपालिका आणि राज्य सरकारने धोकादायक इमारतींपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी जुन्या मुंबईची नवी मुंबई करणारे धोरण निश्चित करावे असे ते म्हणाले.