नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – कॉंग्रेसला राज्यात लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना केल्यानंतर राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल राहूल गांधी यांच्या निवसस्थानी पार पडलेल्या बैठकीत राहूल गांधींनी वंचित बहुनज आघाडीवरून चांगलीच आगपाखड केली. दलित मतदार तिकडे गेला कसा ? तुम्ही काय करताय असा सवाल विचारला.
त्यानंतर आता दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षपदावर सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे दलितांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस दलित चेहरा समोर आणत आहे. तर दुसरीकडे वंचितसोबतही चर्चा करण्याची तयारी दाखवत आहे. त्यामुळे खरोखरच दलितांना आकर्षित करण्यात कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळेल का अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवडणुक आलेल्या सर्व खासदारांनी तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी देखील राहुल गांधी यांची समजूत काढली. मात्र, त्याचा काही एक परिणाम झाला नाही. राहुल गांधी हे राजीनामा देण्यावर ठाम राहिले. तेव्हापासुन काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण याबाबत देशभरात चर्चा चालु आहे. अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या गळया पडणार आहे. त्यावर गांधी कुटुंबियांसह, गांधी कुटुंबाच्या जवळ असलेल्या सल्लागारांनी शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या अध्यक्षांची लवकरच घोषणा केली जाणार अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल या पदांवर काम केलेल्या सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाला गांधी कुटूंबियांनी देखील पसंती दिली आहे. सुशिलकुमार शिंदे हे यंदा लोकसभा निवडणुकीत सोलापूर येथून पराभूत झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सुरवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आज सुशिलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. शिंदे यांच्या नावावर गांधी कुटूुंबियांनी देखील शिक्कामार्तब केले असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.