मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसची राज्यात धुळधाण उडाली. कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधींसोबत काल झालेल्या बैठकित राज्यातील पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासोबतच लोकसभा निवडणूकीत क़ॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेसला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांनीही हा सूर आळवला. त्यानंतर मात्र राहूल गांधीनी आक्रमक होत दलित मतदार वंचितकडे का गेले ? तुम्ही काय करत होता ? तुम्हाला मतदार टिकवून ठेवता आले नाहीत का ? असा सवाल त्यांनी विचारला.
राहूल गांधी यांचे रुप पाहून कोणत्याही नेत्याला उत्तर देता आले नाही. मात्र राहूल गांधींनी वंचितसोबत चर्चा करा अशी तंबीही नेत्यांना दिली. वंचित बहुजन आघाडीशी बोलणी करण्याची जबाबदारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती नेत्यांनी दिली. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीने राज्यात कॉंग्रेसकडे ५० जागांची मागणी केली असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली. परंतु कॉंग्रेस नेत्यांनी २५ ते ३० जागा देण्याचा सूर आळवला. त्यानंतर राज्यातील नेत्यांशी बोलणी केल्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करावी असे आदेश देण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस अध्यक्ष ?
राहूल गांधी यांनी लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसच्या राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र आथा सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या आहे. सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल्यास महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत त्याचा फायदाही होईल अशी चर्चा सुरु आहे. सुशील कुमार शिंदे कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यास महाराष्ट्रातील व्यक्ती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती पदावर बसणार. तर दलित मतदारांना राज्यात आपल्याकडे वळविण्यासाठी कॉंग्रेसने दलित नाव पुढे केल्याची चर्चा आहे.