श्रीनगर : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वचषकातील काल झालेल्या भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने भारताच्या विजयाचा रथ रोखला हा पहिलाच पराभव असलल्याने भारतीयांच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे. मात्र या पराभवावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी खळबळजनक मत व्यक्त केलं आहे. भगव्या जर्सी मुळेच भारतीय संघाचा पराभव झाला आहे. असे मत त्यांनी व्यक्त आहे.
बर्मिंगहॅम येथे विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड दरम्यान सामना पार पडला त्यात इंग्लडने भारताला ३१ धावांनी मत दिली आणि भारताचा विजयरथ रोखला. या अटीतटीच्या झालेल्या लढाईत इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी मात करुन, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत पाच बाद ३०६ धावांचीच मजल मारता आली.
याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, “तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता, पण या जर्सीनेच विश्वचषकातील भारताची विजयी घोडदौड रोखली.
https://twitter.com/MehboobaMufti/status/1145387688951836672
काही दिवसांपूर्वी सपा नेतेअबू आझमी यांनी भगव्या जर्सीला विरोध केला होता. या यामुळे भगवीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब, दलित मतदार आकर्षित होणार ?
‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’