मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आरपीआय ( ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी अखेर लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून आठवलेंच्या मागणीला पूर्ण विराम मिळाला आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे याना भाजप सेनेनकडून ( युतीचा )उमेदवारजाहीर केले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत रामदास आठवले यांना राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे आठवलेंनी माघार घेतली.
आठवले बोलताना म्हणले कि मी या मतदार संघातून निवडून आलो होतो. या मतदार संघाला एक वेगळा इतिहास आहे. २०१४ च्या लोकसभाच्या निवडणुकीनंतर माझे भाजप- सेनेच्या ( युती ) सोबत बोलणे झाले होते. त्यामुळे मी दक्षिण मुंबई मधून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले होते.पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बोलणे झाल्यानंतर मी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत आहे. असे आठवले म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे दिलेले आश्वासन स्विकारत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. असे आठवलेंनी जाहीर केले.