नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाने नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून अमिता चव्हाण यांना उमेदवारी देतील अशी चर्चा होती पण भाजपा कडून वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार भक्कम मजबूत असल्याने ह्या निवडणूक मध्ये अशोक चव्हाण यांना लोकसभा उमेदवारी दिली त्या वेळी अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा बिगुल सुद्धा तात्काळ वाजवला व त्यांनी सभे चे नियोजन करून रविवार दि २४ मार्च रोजी प्रचाराचा नारळ अशोक चव्हाणांनी फोडला ते मरळक येथे बोलत असताना बोलले की,मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेता केवळ घोषणाबाजी करुन जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाला मतदारांनी आता धडा शिकवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. कर्जमाफीच्या कोट्यवधीच्या जाहिराती केल्या. प्रत्यक्षात याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगत बेरोजगारांचीही भाजपाने थट्टा केल्याचे ते म्हणाले. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारने डिझेल,पेट्रोल ची दरवाढ करीत शेकडो कोटी रुपयाची लूट केल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.
नांदेड जवळील मरळक येथे अशोक चव्हाण छोटी सभा घेतली त्यावेळी बोलत असताना ते म्हणाले विमलेश्वराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ही ताकदच मला विजय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त करीत या भागात आल्यानंतर त्यांना वडिलांची आठवण नक्की येते.निवडणुका येतील-जातील परंतु जनतेशी माझे असलेले नाते अतूट असल्याचे सांगत हीच माझी ताकद असल्याचेही ते म्हणाले. राज्यामध्ये काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत ५६ पक्ष, संघटना जोडल्या गेल्या आहेत. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच आम्ही एकत्रित आलो आहोत, याच हेतूने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराचे उंबरठेही आम्ही झिजविले. परंतु, त्यांच्या मनात नेमके काय आहे? ते आम्हाला कळाले नाही. ‘जागा कितीही घ्या, पण आघाडी करा’ अशी आमची भूमिका होती. मात्र नांदेड, बारामती सह सोलापूरच्या जागावर वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने आमच्यासमोर पर्याय नव्हता, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रारंभी आ. डी. पी. सावंत यांच सुद्धा भाषण झाल.