गुरुग्राम : वृत्तसंस्था – शाहीन बागवर भाजपा प्रवक्ता आणि करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अम्मू यांनी म्हटले आहे की, दिल्ली पोलीस जर कुचकामी ठरत असतील तर करणी सेना उत्तर देण्यास तयार आहे. आम्ही प्रथम छेडत नाही आणि नंतर सोडत नाही. जर आम्ही तोडण्यावर उतरलो तर जबडा तोडून टाकू.
अम्मू यांनी म्हटले की, देशात हिंदूंना शिव्या दिल्या जात आहेत. 25 करोड मुस्लीमांनी हिंदूंना सहज घेऊ नये. जर शाहीन बागप्रमाणे इंडिया गेटवर करणी सेना बसली तर त्याचे परिणाम वाईट होतील. करणी सेना अशा लोकांना धडा शिकवेल.
हिंदुंच्या वाटेला जाऊ नका
अम्मू यांनी म्हटले की, देशातील 110 करोड हिंदूंच्या वाटेला कुणी जाऊ नये. यावेळी त्यांनी शरजील इमाम आणि कन्हैया कुमारवर सुद्धा निशाना साधला. अम्मू म्हणाले की, हे लोक देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे. देशाच्या गद्दारांवर करणी सेना उपाय करेल.
काँग्रेसला देशाचे विभाजन करायचेय
ते म्हणाले, हिंदुत्वाच्या ठेकेदारांचा नाईलाज असेल पण करणी सेनेचा कोणताही नाईलाज नाही. हिंदूंनी बांगड्या घातलेल्या नाहीत. राहुल गांधी, गांधी नाहीत. काँग्रेसला देशाचे विभाजन करायचे आहे. धर्माच्या नावावर काँग्रेसने देशाचे विभाजन केले आहे.