नवी दिल्ली – मोदी सरकार दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर आर्थिक प्रश्न सुटतील, रोजगार वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र जून महिन्यातील बेरोजगारीचा दर हा मागील 33 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमी या संस्थेने या संबंधित आकडेवारी जाहिर केली आहे.
सीएमआयईईच्या अहवालानुसार जूनमध्ये बेरोजगारीचा दर वाढून 7.91 टक्क्यांवर पोहोचला होता. याआधी सप्टेंबर 2016 मध्ये बेरोजगारीचा दर सर्वोच्च पातळीवर होता. यावर्षीच्या मे महिन्यात हा आकडा 7.2 टक्क्यांवर पोहोचला होता. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जून हा त्यांच्या नव्या कार्यकाळाचा पहिलाच महिना होता. जुन महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात बेरोजागीरचा दर हा तब्बल 9 टक्के होता. मात्र जून महिना अखेरपर्यंत तो कमी होवून सात टक्यांवर आला.
2019-20 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये रोजगाराचा दर 39.6 टक्के होता. 2016 नंतर एका तिमाहीमधील रोजगाराचा हा सर्वात कमी दर आहे. मार्च 2019 च्या तिमाहीमध्ये रोजरागाच्या दराच्य आकड्यात 39.7 टक्क्यांवरून 39.9 टक्क्यांपर्यत वाढ झाली आहे. असे देखीस सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालामध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाकडून देशातील ‘रोजगार निर्मिती व बेरोजगारीच्या आकडेवारी प्रसिध्द केली जाते. मात्र बेरोजगारी विषयी अधिकृत आकडेवारी २०१६ सालापासून त्यांनी प्रसिध्द केलेली नाही.