बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक चॅनलचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. रिपब्लिककडून असा आरोप होत आहे, की पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून त्यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे, की विरोधात टीका करणाऱ्या चॅनल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न, सुप्रिया सुळे यालाच आणीबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय.” असंही ते म्हणाले आहेत. यासोबत उपाध्ये यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
विरोधात टीका करणाऱ्या चॅनेल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न @supriya_sule यालाच आणिबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय https://t.co/Rlu7IHvDae
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 4, 2020
मेट्रो कारेशडच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आता केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचं हनन होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. यावरून उपाध्ये यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, की “कांजूर येथील ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असेत, त्यावर त्याचा पहिला अधिकार असतो. केंद्र सराकर सातत्यानं राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसत आहे. है दुर्दैवी आणि निंदाजनक आहे.”