सातारा : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकित मोदी सरकार मागील निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आले राज्यात ४८ जागांपैकी युतीला ४१ जागा मिळाल्या आहेत. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे विजयी झाले असून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे पराभूत झाले आहेत.
दरम्यान ,सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सेनेचे नरेंद्र पाटील यांना पराभूत केले.साताऱ्यातून उदयनराजे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.काल लोकसभेचे निकाल लागले विजयी झालेल्या अनेक उमेदवारांनी गुलाल अंगावर घेत जल्लोष केला .मात्र उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून विजयी झाले असून त्यांनी कोणताही जल्लोष न करता गुलाल अंगावर घेणार नाही असं असं म्हटलं आहे .ते म्हणाले सध्याच्या परिस्थितीत राज्य दुष्काळात आहे असे मांडले आहे . माझं राज्य दुष्काळात, मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे.
यापूर्वी सुद्धा उदयनराजे यांनी पुलवामा हल्ला झाल्यामुळे वाढदिवस साजरा करणार नाही असं पत्रक जारी करून सांगितलं होतं.