मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी या फॅक्टरची राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.
महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणारे आंबेडकर यांना दलित आणि मुस्लीम समाजाचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे त्यांच्या सभेतून जाणवत होते. मात्र, निकालाची आकडेवारी ज्याप्रमाणे दिसत आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद सोडून कुठेच आघाडी मिळताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकर हे स्वतः पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे.
अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असून तेथे आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.