बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राचे पोलीस महासंचाक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्री औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं गृह मंत्रालयाच्या याबाबतच्या प्रस्तावाला काल मंजुरी दिली(Devendra Fadnavis) असून नियुक्तीपासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्या हाती सोपवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या प्रतिनियुक्तीवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिशय कार्यक्षम असे डीजी महाराष्ट्राला लाभले होते. परंतु त्यांना कुठेही विश्वासात न घेता कारभार चालला आहे. पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे, तो जरी गृहमंत्रालयाच्या अधिकारात असला, तरी त्याची स्वायत्ता आहे असंही त्यांनी सांगितलं.
Interaction on Maharashtra issues, with media this morning at Nagpur pic.twitter.com/I8s6EDApV8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2020
पुढं बोलताना ते म्हणाले, सरकारनं सुपरवायझर म्हणून या विभागाकडे काम केलं पाहिजे. परंतु लहानातील लहान बदल्यांपासून अनेक गोष्टीत हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळं डीजींनी हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी प्रतिनियुक्ती घेत आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषावह नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते. त्यानंतर ते मुंबईत आले. 3 वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले होते. आता ते केंद्राच्या सेवेत गेल्यानंतर त्यांच्या जागी नवे महाराष्ट्र पोलीस महासंचालक येणार आहेत.