बहुजननामा ऑनलाईन- राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढीबरोबरच मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात उच्चांकी 14 492 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर याच दरम्यान 326 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 43 हजार 289 इतकी झाली असून राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.84 टक्के इतके आहे.
एकीकडे कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 326 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 21 हजार 359 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.32 टक्के इतके आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
14,492 new #COVID19 cases, 12,243 recoveries & 326 deaths reported in Maharashtra today. Total number of COVID cases rises to 6,43,289 in the state, which includes 4,59,124 recovered cases, 1,62,491 active cases & 21,359 deaths till date: State Health Department, Maharashtra pic.twitter.com/QmEYAp1fh2
— ANI (@ANI) August 20, 2020
राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 12 हजार 243 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 4 लाख 59 हजार 124 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.37 टक्के इतके आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 62 हजार 491 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरु आहेत. राज्यात 11 लाख 76 हजार 261 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 639 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात 34 लाख 14 हजार 809 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.