बहुजननामा ऑनलाइन टीम –
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचं देखील प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे तब्बल 14718 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 355 जणांचा मृत्यू झाला आहे.
14,718 new #COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,33,568 including 5,31,563 recoveries and 23,444 deaths. Number of active cases 1,78,234: State Health department pic.twitter.com/iFWUuhfBoQ
— ANI (@ANI) August 27, 2020
राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 33 हजार 568 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 5 लाख 31 हजार 563 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यपरिस्थितीत राज्यात 1 लाख 78 हजार 234 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत तर आतापर्यंत कोरोनामुळं राज्यातील 23 हजार 444 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 9 हजार 136 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.46 टक्के एवढं आहे. राज्यातील कोरोना रूग्णांचा मृत्यूदर हा 3.2 टक्के एवढा आहे.