बहुजननामा ऑनलाईन – गांधी परिवाराच्या जवळचे डॉ. संजय सिंह यांनी कॉंग्रेस आणि राज्यसभा सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. बुधवारी ते भाजपमध्ये सामील होणार आहे. संजय सिंह हे अमेठीच्या राजपरिवारामधून आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संजय सिंह सुलतानपूर लोकसभा मतदार संघात होते, पण ते आपला जामीनही वाचवू शकले नाही.
डॉ. संजय सिंह हे आसाममधील राज्यसभेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी शिल्लक होता, असे असूनही त्यांनी राज्यसभा आणि कॉंग्रेस सोडण्याचे जाहीर केले. संजय गांधी यांचे मित्र संजय सिंह यांनी आपली राजकीय पारी काँग्रेसपासून सुरू केली होती, पण राममंदिर आंदोलनाच्यावेळी ते कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते.
Congress Rajya Sabha MP, Sanjay Singh: Congress is still in the past, unaware of the future. Today, country is with PM Modi & if the country is with him, I'm with him. I will join BJP tomorrow. I have resigned from the party, as well as my membership of Rajya Sabha. pic.twitter.com/waAuPdFu9A
— ANI (@ANI) July 30, 2019
राजीनामा दिल्यानंतर संजय सिंह म्हणाले, कॉंग्रेसचे नेतृत्व शून्य असल्याने मी कॉंग्रेस सोडत आहे. विकासामुळे मी मोदींचे समर्थन करतो. ते म्हणाले, ‘कॉंग्रेस अजूनही भूतकाळात आहे, त्यांना भविष्याविषयी माहिती नाही. आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे आणि जर देश त्याच्याबरोबर असेल तर मीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे. उद्या मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. मी पक्ष आणि राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.’
१९९८ मध्ये कॉंग्रेसचे सतीश शर्माचा पराभव करून संजय सिंह अमेठी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये परतले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय सिंह सुलतानपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय सिंह कॉंग्रेसवर नाराज झाले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना आसाममधून राज्यसभेवर पाठविले. यामुळे त्यांची दुसरी पत्नी अमिता सिंह यांनी सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, पण त्यांना जिंकता आले नाही. मात्र, संजय सिंहची पहिली पत्नी गरिमा सिंग सध्या अमेठीच्या भाजप आमदार आहेत.
संजय सिंह यांची पत्नी अमिता सिंह यांनीही कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. अमिता सिंह ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेस (यूपी) च्या अध्यक्षा होत्या. संजय सिंह म्हणाले, ‘1984 पासून कॉंग्रेसशी संबंध आहेत. पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा काँग्रेसवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. गेल्या १५ वर्षात कॉंग्रेसमध्ये जे काही घडले ते यापूर्वी कधी झाले नव्हते. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे.