बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूकांसाठी शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केल जात आहे. त्यातच आता ते निवडणुक लढविणार असल्याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे. पण आदित्य यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार उतरविण्यासाठी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरु केली. आदित्य यांच्याविरोधात डॉ. सुरेश माने यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्याची शक्यता आहे. डॉ. माने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे साथीदार आहेत. त्यांनी बीआरएसपी हा पक्ष स्थापन केला होता. विधानसभा निवडणुकीत हा पक्ष काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहितीही माहिती मिळाली आहे.
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्यही राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. आदित्य यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे वरळी विधानसभा मतदार संघाच्या गटप्रमुखांच्या बैठकीत मागणी करण्यात आली होती. त्यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवून राज्याचे नेतृत्व करावं’, अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. यावर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब करुन ‘विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत’. असे विधान केले होते.
Visit : bahujannama.com