नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघावे व योग्य नियोजन करून नेमका तोडगा काढावा यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सुपूर्द केले.
देशभरात तसेच महाराष्ट्रात निवडणुका येतात, जातात परंतू आज दुष्काळात सापडलेला बळीराजा उध्दवस्त झाला, तर आख्खा देश संपुष्ठात येईल.कारण बळीराजा जगला तर देश जगेल यामुळे प्राध्यान्यक्रमाने टंचाईच्या काळात बळीराजाला वाचिवण्यासाठी तसेच बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी दौरे अयोजित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान संपताच मंगळवार दि.३०एप्रिल रोजी सांगोल्याला गेले. त्यानंतर त्यांनी अजनाळे येथे दुष्काळाने जळालेल्या फळबागा, कोरडी पडलेल्या शेततळ्यांची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत आहे.