औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सांस्कृतिक, धार्मिक, या मुद्यावर १९२५ पासून आजतागत काम करीत आहे, त्याने येथील व्यवस्थेमध्ये एक समानंतर व्यवस्था निर्माण करण्याच्या पद्धतीने काम करते. आरएसएस वर महात्मा गांधी यांची हत्य करण्यासाठी विखारी वातावरण तयार केल्याचा ठपका ठेवत ४ फेब्रुवारी १९४८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीचा निर्णय घेतला होता. त्याची आठवण म्हणून सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिनाचे आयोजन करण्यात आले. हिंदू महासभेच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या गांधी पुण्यतिथी रोजी केलेल्या कृत्याचा निषेध करून राष्ट्रपित्याचा अवमान करण्याऱ्याना देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्याची मागणी करण्यात आली.
युथ फॉर डेमॉक्रसी, निर्धार सोशल फाउंडेशनतर्फे सोमवारी (चार फेब्रुवारी) सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिन पाळण्यात आला. यानिमित्त क्रांती चौकात धरणे देण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती; त्या घटनेला ७० वर्षे पूर्ण झाल्याने त्याची उजळणी व्हावी आणि तरुणांना इतिहासाची माहिती होण्यासाठी दिन पाळण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
या धरणे आंदोलनात प्रा. डॉ. हृषीकेश कांबळे, डॉ. गुरुदत्त राजपूत, डॉ. दिलीप चव्हाण, राजेश मुंढे, डॉ. उल्हास उढाण, बाळासाहेब गरुड आदी मान्यवरांसह युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाउंडेशनचे सदस्य अक्षय पाटील, प्रतीक पाटील, अॅड. संदीप पाटील, अमोल दांडगे, भास्कर पाटील यांची उपस्थिती होती.