मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरा अन् सर्व ग्रामपंचायतींवर (Gram Panchayat) भगवा फडकवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी राज्यातील शिवसैनिकांना दिले आहेत. .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यातील सर्व शिवसेना (Shiv Sena) संपर्क प्रमुखांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी जोमाने कामाला लागा, गावागावात जनहिताची कामे करून जनतेची विश्वास संपादन करण्याच्या सूचना दिल्या. राज्यातील 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी शिवसेनेने जोरदार कंबर कसली आहे. यासाठी शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना राज्यातील सर्व ग्राम पंचायत निवडणुका लढणार आहे. 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
आधी निवडणूक, मग सरंपचपदाचे आरक्षण या निर्णयामुळे गाव खेड्यावर होणार परिणाम
दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे.