बहुजननामा ऑनलाइन टीम : पाकीस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसेभेनंतर बुधवारी 117 विरुद्ध 92 च्या फरकाने राज्यसभेतही मंजूर झाले. 117 मते नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने पडली. त्याचबरोबर 92 विधेयकाच्या विरोधात मते पडली. राज्यसभेत या विधेयकावर मतदान घेण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यावरुन भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रोज नवे युटर्न.. सत्तेसाठी पाहा कशी कमाल..कॉंग्रेसची हमाल दे धमाल! अशा शब्दात शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता,त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते.
रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 11, 2019
आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला. आणि म्हणाले की, ” देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता, त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको ? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!’ त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजुर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भाजपामुळे जगभरातील हिंदूंना भारत हे आश्रयस्थान झाले आहे. काहींचा विरोध होता. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले. काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले! असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. गृहमंत्री अमितभाईं शाह यांचे अभिनंदन!!!
जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले.काहींचा विरोध होता..
काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले..
काहीजण "जनपथला" घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 11, 2019
लोकसभेनंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेतही संमत झाले. मात्र, काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील सत्तापाटपावरुन भाजपाशी असलेली युती तोडणाऱ्या शिवसेने लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन दिले होते. परंतू राज्यसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला होता. त्यामुळे शिवसेना राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेसच्या दबावाखाली असे करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Visit : bahujannama.com