पुणे : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA सरकारने प्रचंड बहुमत मिळवत देशात एकहाती सत्ता मिळवली परंतु यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्रचंड बहुमताने निवडून येणारे केंद्रातील भाजप सरकार हे लोकांनी निवडून दिलेले नाही तर ईव्हीएम मशिनमुळे निवडून आलेले सरकार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. पुणे येथे रोहिणी टेकाळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पुणे महापालिका प्रभाग क्र. १ च्या पोटनिवडणुकीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करू देणार नाही. तसेच वंचित बहुजन आघाडी या पोट निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, ज्येष्ठ नेते वसंत साळवे, महिला अध्यक्ष अनिता चव्हाण, संतोष संखद आदी मान्यवर उपस्थित होते.