मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अनलॉकवरून काल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे अश शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला. मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत, असाही सल्ला त्यांनी दिला. मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न
ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाही. परंतु त्यापूर्वीच त्यांचे पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. किमान काम करुन तरी श्रेय घ्यावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे
अनलॉकच्या घोषणेवरून कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. यापूर्वीही अनेक वेळा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधन आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे. ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ही उत्तर नव्हतं
गोंधळ इतका निर्माण झाला की, लॉकडाऊन आहे की नाही यासंदर्भात लोकांचे फोन आले. परंतु आमच्याकडेचं याच उत्तर नव्हतं. मात्र, काही वेळाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून पत्रक काढण्यात आले. लॉकडाऊनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे लोकांना काल घोषणा झाल्यानंतर वाटले झालं सुटलो. लहान दुकानदारांना निर्बंध संपल्याचे वाटले. अनेक दुकानदारांचा 7 ते 2 या वेळेला विरोध आहे. त्यांनी 9 ते 4 अशी वेळ करण्याची मागणी केली आहे. परंतु अनेकांची निराशा झाली आहे. सरकारने या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
कृपया हे देखील वाचा:
दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीची आत्महत्या
कोरोनामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, 4% वर कायम राहणार
संशयितांना हटकल्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी
ओम प्रॉपर्टीच्या भागीदारांवर एकाच जागेवरुन दुसरा फसवणुकीचा FIR दाखल
Unlock च्या गोंधळावरून फडणवीसांची सरकारवर टीका, म्हणाले – ‘ही अपरिपक्वता की श्रेयवाद?’