पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशातील जवळपास पाच टप्प्यातील मतदान संपले असून दोन टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे आता सगळ्यांना निकालाची आतुरता लागली आहे . भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला आहे तो फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते .
यंदाच्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील असा प्रश्न विचारला असता आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र त्याचे मार्केटिंग करत नाही असा अप्रत्यक्ष काँग्रेस- भाजपाला टोला त्यांनी लगावला. यापूर्वी, यंदाच्या निकालात भाजपला १४८ ते २०० जागा तर काँग्रेसला १०० पर्यंत जागा मिळतील, असे भाकीत आंबेडकरांनी केले होते. लोकसभेच्या सगळ्या उमेदवाराचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले असून त्यांचा निकाल येत्या २३ रोजीच कळेल .